पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवाची मुंबई....

इमेज
(फोटो जरी जुना असला तरी अनुभव मात्र नवा आहे..) जीवाची मुंबई मुंबई…. सतत काही ना काही कारणांनी खुणावणारं शहर..  पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहर माझ्या कमालीची आवडती आहेत. त्याची अनेक कारणं आहेत. दोन्ही शहरांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. पुणे तस बऱ्या पैकी शांत शहर आहे आणि त्या उलट मुंबई.. इथे कधी रात्रच होत नाही. सतत माणसांची वर्दळ असते, ये जा सुरू असते.. मुंबई झोपत नाही हे खरं आहे पण ती अनेकांची स्वप्न पूर्ण करते हे ही खर आहे. दी.१६/१२/२०२२ रोजी मुंबईला जाणं झालं. पुण्याइतक्या नसल्या तरी मुंबईच्या ही गोड अशा रम्य आठवणी आहेत. मुंबईचे माहीत नसलेले काही रस्ते आज ही आठवणीत आहेत. त्यांची नावे माहीत नाही, पुन्हा होऊन तिथे जायचं कसं हे ही आठवणार नाही आणि समजणार ही नाही. पण त्या रस्त्यांनी दिलेली आठवणींची शिदोरी मात्र कायम लक्षात राहणारी आहे. काहीं चांगले, काही वाईट आणि काही रोमँटिक अनुभव त्या रस्त्यांनी मला दिले. काळ सरतो, वेळ सरते पण गतकाळातील या आठवणी मात्र कायम सोबत राहतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत तीन गरजा सांगितल्या आहेत. मला त्यात आठवणींना ही ऍड करुशी ...

कळले सारे होते..

न कळता ही तुला कळले सारे होते, रात न ही अपुली कळले सारे होते, एक वादळ आले अन घेऊन सारे गेले, आठवणींचे गाव माझे जळले सारे होते. पहिल्या भेटीचे किस्से अजून ताजे आहे, उष्ट्या चहाव आपले जुळले सारे होते. कैक रस्ते मग असेच पालथे घातले, एका वळणावर मग वळले सारे होते. तुझ्या न माझ्या नव्हते हातात काही, जातीचे विष असे भिनले सारे होते. तु न एकटा एवढे लक्षात ठेव आता, त्या दगडावर चाफे फुलले सारे होते.  #सत्यशामबंधू  #_shubhra_

आज रक्षाबंधन...

आज  रक्षाबंधन. दि. ११/०८/२०२२ भारतीय संस्कृतीत बंधनाला खूप महत्त्व आहे. कुठलाही समाज हा एकट्याने अस्तित्वात येत नसतो. समाज नावाची व्यवस्था उभी राहायला एकापेक्षा अधिक लोकांची गरज असते. आणि हीच गरज पूर्ण करण्यासाठी काही समाज धुरिणांकडून काही बंधन-नियम आखण्यात आले आणि त्यांचेच पुढे सण समारंभ झाले असं माझं मत आहे. त्यातीलच एक बंधन म्हणजे रक्षा बंधन...  बहिणीचे भावाने रक्षण करावे यासाठी हि संकल्पना अस्थित्वात आली असावी असे वरपांगी दिसून येते. पृथ्वीवरील काही मोजक्या संस्कृत्या सोडल्या तर जवळपास सर्वच संस्कृत्या या पुरुषप्रधान आहेत. त्यामुळे अनेक सण हे त्या नुसारच डिझाईन झालेले दिसतात. पण आजच्या काळाचा विचार केला तर यात अनेक क्रातींकारी बदल होताना दिसतात. आता रक्षाबंधनाचाच विचार केला तर असे दिसून येते कि, आज रक्षाबंधन हे साथ, सोबत करणाऱ्या प्रत्येक नात्याकडून बांधून घेतेले जाते. तू माझे रक्षण कर एवढाच आता हेतू रक्षाबंधनामागे राहिलेला नाहीये. हे प्रमाण अत्यल्प जरी असलं तरी ते आशादायी निश्चितच आहे.  भाऊ बहिणीचे रक्षण करू शकतो, तिला साथ देऊ शकतो, तिच्या मागे ठामपणाने उभा राहू शकतो...

संत चमत्कार : माझा दृष्टिकोन

इमेज
रंग चैतन्याचा... रंग वारीचा... विषय :- संत चमत्कार.... आज हा विषय निवडण्यामागे अनेक कारणं आहेत. आषाढ वारीचा सोहळा आता पुण्यनगरी सोडून पंढरीच्या दिशेने पुढे सरकला आहे. वारकऱ्यांचा उत्साह  हा बरसणाऱ्या पावसाप्रमाणे वाढतच चालला आहे. वारीच्या पर्वात आमच्याही अनेकांबरोबर वारीविषयी सतत चर्चा झडत असतात. असाच एकदा विषय निघाला की संतांनी केलेले किंवा त्यांच्या नावावर काळाचा परिणाम म्हणून आरूढ झालेले चमत्कार आजच्या विज्ञान युगात खरे मानायचे की नाही.  मुळात संतांच्या या चमत्काराविषयी कुठेही ठोस पुरावा नाही. संतांचे जे चरित्रकार होते त्यांनी जे लिहून ठेवलं तेच आज खरं मानलं जातं आहे. मी स्वतः चांगलं किंवा वाईट असा भेदाभेद करत नाही. या जगात काहीच चांगलं किंवा वाईट नसत अस माझं ठाम मत आहे. आपला एखादा जवान जेव्हा पाकिस्तान कडून झालेल्या हल्ल्यात शहीद होतो तेव्हा ती आपल्या साठी वाईट तर पाकिस्तान साठी चागली गोष्ट असते. हेच उलटही होऊ शकत. भारतीय संस्कृती आणि स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा या संपूर्ण विश्वाला कुटुंब मानतात. मग जर अस असेल तर वर नमूद केलेली घटना आपण कुठल्या आधारा...

भौतिक सुख आणि संतसाहित्य...

इमेज
सर्व सुखाचे आगरू । बापराखुमादेवीवरू ।। असं माऊली म्हणतात. ते खरंच आहे. सुखाची आनंदीची शोधाशोध तुम्ही भौतिक जगात कितीही घ्या. तिथे त्याचा शोध कधीच लागणार नाही. ते सुख विठ्ठलाच्या चरणातच आहे. मुळात हे जगच एक संसार आहे. तुम्ही आम्ही जन्म घेतो तेव्हापासून या संसाराची आपल्या आयुष्यात सुरुवात होते. लग्न आणि त्यानंतर वाढणारा एकूणच पसारा हा या संसाराचा अत्यंत छोटा भाग आहे.  मग संसार म्हणजे काय..? मला अस वाटतं की, जिथे बंधन येतात तो संसार.. मानवाने बंधमुक्त जगावं, स्वतंत्र असावं अस फक्त आपण म्हणतो पण तस आहे का..? तर अजिबात नाही.. जन्म झाल्याबरोबर आपल्यावर काही ना काही बंधन येतात. मग ती काही आपली स्वतःचीच असतात,काही कौटुंबिक असतात तर काही सामाजिक असतात. आणि या सर्व बंधनातून सुटण्यासाठी आपण भौतिक सुखाच्या मागे लागतो. गाडी, बांगला, कपडे- लत्ते, आभूषणे आणि इतर इतर इतर... या सगळ्या गोष्टी जमवायला लागतो.आणि या सर्वांच्या मागे इतके लागतो की खरा आनंद, समाधान कशात आहे हेच विसरून जातो.  आता काही जण म्हणतील. मग माणसाने पैसाच कमावचा नाही तर जगणार कसे..? असा प्रश्न आला की मला खरच हसायला...

वर्तुळ... वर्तुळाच परिघ आणि तुम्ही आम्ही...

इमेज
प्रत्येकाचं एक वर्तुळ असतं. त्या वर्तुळाच्या आत, परिघावर आणि बाहेर अशी काही प्रेमाची, नात्याची, ओळखीची माणसे असतात. नव्या जुन्यांची ये जा असते.. ही एक सतत चालणारी प्रक्रिया असते. सात अब्ज पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या जगात अशी ये जा अगदीच साधी आणि सहज गोष्ट आहे. त्यामुळे वर्तुळाच्या बाहेर आणि अगदी परिघावर सुद्धा कोण आहे..? का आहे..? याचा विचार आपल्याकडून फारसा होत नाही. सहसा कामानिमित्ताने होणाऱ्या ओळखी या परिघावर असतात आणि बाकीचे परिघाच्या बाहेर.. खर जीवन असतं ते परिघाच्या आतल्या माणसांबरोबर. त्यात आपल्या घरचे असू शकतात पण असतीलच असे नाही. वर्तुळाच्या आत तेच असतात जे आपल्याला हवे असतात. तिथे बंधन म्हणून काहीच नसतं. आपण स्वतःच्या मनाला भावलेल्या व्यक्तींना परिघाच्या आत घेत असतो. हे सर्वस्वी आपल्या मनाच्या मान्यतेवर अवलंबून असते. परंतु जेव्हा आपल्याला इतरांच्या परिघाच्या आत जायचं असतं तेव्हा नक्की आपण कसे वागतोय यावर बरचसं अवलंबून असतं. इथे दोन मार्ग संभवतात.. एक म्हणजे जबरदस्तीने आणि दुसरा प्रेमाने…. जबरदस्तीने कुठलीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत सध्या होऊ शकते. परंतु इथे म...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

इमेज
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो बघिणींनो आणि मातांनो ..., मी माझ्या भाषणाची सुरुवात मुद्दामच अशी केली. कारण आज मी बोलणार आहे अखंड हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल.  बाळासाहेब म्हणजे आग,  बाळासाहेब म्हणजे तेज, बाळासाहेब म्हणजे ताठ कणा , बाळासाहेब म्हणजे ठाकरी बाणा, बाळासाहेब म्हणजे हिंदूंची आन, बान , शान..  अन बाळासाहेब म्हणजे आम्हा शिवसैनिकांचे प्राण....  अशा ह्या भरतभूमिच्या वाघा बद्दल दोन शब्द बोलण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे.  मित्रहो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपणाला ठाऊकच आहे. १०६ मर्द मराठ्यांच्या बलिदाने आपल्याला मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र मिळाला. केवढे हे शौर्य आणि केवढा हा त्याग... मी त्या सर्व शहिदांसमोर नतमस्तक होतो. माझा तुम्हाला सवाल आहे.. काय संयुक्त महाराष्ट्र झाल्याने मराठी जनांचे प्रश्न सुटले होते..? काय मराठी जनांना हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या होत्या...? दुर्दैवाने याची उत्तरं नाही अशीच द्यावी लागतात. आपल्या दुबळेपणाचा फायदा कायमच परके घेत आले आहे. इथे हि तसेच झाले. मुंबई तर मिळ...