विकृत मनोवृत्ती आणि हिंदू महासभा
"जे खलांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भुतास्परस्परे पडो । मैत्रजीवांचे ।। " --------------------------------------------- संत ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज वरील ओवीतून जगाच्या निर्मिकाकडे मागणे मागतात की, ' हे देवा, जे खलप्रवृत्तीचे आहेत त्याचं खलत्व जाऊन, त्यांच्यातील सत्कर्म करण्याची वृत्ती वाढीस लागु दे आणि संपूर्ण जीवांमध्ये मैत्रीची भावना जागृत होउदे." वरील ओवीचा आमच्या ज्ञाना प्रमाणे तरी असाच अर्थ होतो. आता प्रश्न असा आहे की, हे आम्ही आत्ताच का सांगत आहोत. तर त्याला कारण आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या एका कार्यक्रमात एका उच्च विध्याविभूषित महिलेने महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडून त्यांची त्यांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी प्रतिकात्मक रित्या हत्या केली. ही महिला महासभेची राष्ट्रीय सचिव असल्याचं सांगितलं जातं. आता या विकृत मानसिकतेच्या लोकांनी केलेल्या या विकृत घटनेचा संत ज्ञानेश्वरांच्या ओवीशी काय संबंध... त्याच कारण अस की, आम्ही त्या लोकांसाठी ही देवाकडे हीच प्रार्थना मागत आहोत की त्यांचं खलत्व जाणून ते सन्मा