भौतिक सुख आणि संतसाहित्य...
सर्व सुखाचे आगरू । बापराखुमादेवीवरू ।। असं माऊली म्हणतात. ते खरंच आहे. सुखाची आनंदीची शोधाशोध तुम्ही भौतिक जगात कितीही घ्या. तिथे त्याचा शोध कधीच लागणार नाही. ते सुख विठ्ठलाच्या चरणातच आहे. मुळात हे जगच एक संसार आहे. तुम्ही आम्ही जन्म घेतो तेव्हापासून या संसाराची आपल्या आयुष्यात सुरुवात होते. लग्न आणि त्यानंतर वाढणारा एकूणच पसारा हा या संसाराचा अत्यंत छोटा भाग आहे. मग संसार म्हणजे काय..? मला अस वाटतं की, जिथे बंधन येतात तो संसार.. मानवाने बंधमुक्त जगावं, स्वतंत्र असावं अस फक्त आपण म्हणतो पण तस आहे का..? तर अजिबात नाही.. जन्म झाल्याबरोबर आपल्यावर काही ना काही बंधन येतात. मग ती काही आपली स्वतःचीच असतात,काही कौटुंबिक असतात तर काही सामाजिक असतात. आणि या सर्व बंधनातून सुटण्यासाठी आपण भौतिक सुखाच्या मागे लागतो. गाडी, बांगला, कपडे- लत्ते, आभूषणे आणि इतर इतर इतर... या सगळ्या गोष्टी जमवायला लागतो.आणि या सर्वांच्या मागे इतके लागतो की खरा आनंद, समाधान कशात आहे हेच विसरून जातो. आता काही जण म्हणतील. मग माणसाने पैसाच कमावचा नाही तर जगणार कसे..? असा प्रश्न आला की मला खरच हसायला होत . त्